चोपडा( प्रतिनिधी) आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांच्या आधारकार्डच्या अडचणीसंदर्भात राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व खाजगी शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे दारिद्रय रेषेखालील व आदिवासी कुंटूंबातील आहेत. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा सातपुडा पायथ्याशी असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचा जन्म हा कुठल्याही पाडयावर, वस्त्यांवर अथवा जंगलात होत असतो. त्यामुळे अशा बालकांची नोंद ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्याकडे नसते. परंतु आता आधार कार्ड केंद्रावरील संचालक हे जन्म दाखले शिवाय आधारकार्ड देत नाही. ते पुरावे मागत असतात. त्यामुळे ग्रामसेवक अथवा मुख्याधिकारी हे जन्माचे दाखले देऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हयातील शाळेंच्या विदयार्थ्यांचे आधारकार्ड निघू शकत नाही. तसेच त्यांना बँकेत खाते उघडतांना अडचणी निर्माण होतात.
इतर शिष्यवृत्ती सारख्या योजनांना लाभाच्या योजना देता येत नाही व अत्यंत महत्वाचे संच मान्यता आधारकार्डवर मान्य केलेली असल्याने बरेच शिक्षक बंधू भगिनी हे अतिरिक्त झालेले आहेत. अशा अडचणी येत असल्याने आपल्या स्तरावर आपण योग्य ते मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना आधार कार्ड सहज कसे उपलब्ध होईल याबाबत आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे तसेच याबाबत योग्य निर्णय घेत न्याय द्यावा, असे निवेदन राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकतेच देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सतीश बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष व पारोळा सोसायटीचे संचालक पंकज बडगुजर,जिल्हा कार्याध्यक्ष प्रताप परदेशी,किशोर पाटील उपस्थित होते. यावेळी साहेबांनी सविस्तर चर्चा करून लवकरच प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.