जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेतर्फे चोपडा येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच साऱ्या चोरांनी चोरलेल्या वीजेचे बिल शेतकऱ्यांचे नावावर टाकून वसूल करण्याचे आदेश ज्यांनी दिले ते मंत्री असो की अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निवेदन निवेदन शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांना देण्यात आले.
आंदोलक शेतकऱ्यांशी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी चर्चा करून अधिकाऱ्यांशी चर्चा करत यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्या संदर्भात चर्चा करणेसाठी मंगळवारी विश्रामगृह चोपडा येथे बैठक ठेवली असल्याचे सांगितले. यावेळी एस. बी. पाटील, घनश्यामभाई अग्रवाल, घनश्याम पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मंगळवारी अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले. तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास न भूतो न भविष्य ती असे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
देशात दिल्ली सारख्या दाट लोकवस्तीच्या राज्यात देखील एका आठवड्यात वीज चोऱ्या रोखून वीजबिल निम्म्यावर आणले गेले ते गेल्या कित्येक वर्षापासून तेथे सुरू आहे. म्हणजे आपल्याच देशात स्वस्तात वीज देता येते याचे उत्कृष्ट मॉडेल आहे. तसेच देशभर अनेक विकसित/अविकसित साऱ्या राज्यात अश्वशक्तीवर आधारित वीजबिल शेतकऱ्यांना दिली जात आहेत. जगभर रात्रीची वीज तर घरात देखील स्वस्त असते. विज मंडळाचे खाजगीकरण करायचा डाव शेतकऱ्यांचे नावावर खपवण्यासाठी दर तीन महिन्यांनी खोटी बिले देवून विजचोर ठरवणाऱ्या मंत्री असो की अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा एस. बी. पाटील यांनी दिला.