जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने सर्व प्रार्थना स्थळे खुली केली आहे. मुस्लिम धर्मीयांची प्रार्थनास्थळे म्हणजे प्रामुख्याने मशीद होय. ज्या ठिकाणी दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जाते शासनाने या पाच नमाजासाठी काही मर्यादित लोकांना नमाजची परवानगी पहिल्यापासून दिलेली होती. त्यामुळे १६ नोव्हेंबर पासून मुस्लिमांची प्रार्थनास्थळे म्हणजे मशिदी उघडण्यात आल्या. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
अशा प्रकारची दुआ मानियार बिरादरीच्या कार्यालयात(जामा मस्जिद, जळगाव) मौलाना अब्दुल रशीद यांनी बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या उपस्थित केली.
विशेष दुआ -प्रार्थना
अल्लाह कडे प्रार्थना करण्यात आली की संपूर्ण इस्लाम धर्माचे पवित्र स्थान मक्का-काबा गृह सुद्धा बंद असल्याने या वर्षी हज यात्रा रद्द केली गेली. काबा हे अल्लाह चे घर असल्यानें त्याचे दर्शन,प्रदक्षिणा करता न आल्याने सर्व समाजा वर दुःख पसरले होते त्या मुळे जो पर्यंत तू ही सृष्टी ठेवेल तो पर्यंत तुझे घर आमच्या साठी उघडे ठेव (इतर ठिकाणी मस्जिद सुद्धा) यंदा रमजान,बकर ईद ची नमाज ईद गाह मध्ये झाली नाही,शब ए मयराज,शब ए बारात, शब ए कद्र, व ईद ए मिलादूननबी हे सार्वजनिक रित्या साजरे करता आले नाही म्हणून आमचे गुन्हे माफ कर व आम्हास असे एकटे सोडू नको अशी प्रार्थना करण्यात आली.
बिरादरी तर्फे शहिदांना श्रद्धांजली व निषेध
संपूर्ण भारतात आज सोमवार हिंदू धर्मीय समाज भाऊबीज हा सण साजरा करीत आहे परंतु आज आमच्या कोल्हापूर येथील ऋषिकेश जोंधळे या २० वर्षीय तरुणास पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामुळे मृत्यू पत्करावा लागला व आज तिच्या मोठ्या बहिणीने नयनाश्रुनी सर्वांसमक्ष तिचा अखेरचा निरोप दिला. आम्ही सर्व समाज बांधव त्या बहिणीला सांगू इच्छितो की हा संपूर्ण समाज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे. तुम्ही एक ऋषिकेश गमावला असला तरी अनेक आमीन, अकिल, फारूक,आमिर,हारीश, उमर, ताहेर,रउफ, अल्ताफ हे तुमच्यासमोर ऋषिकेश म्हणून उभे आहेत.
राष्ट्रीय खेळाडू गमविला
ऋषिकेश हा एक चांगला शूटिंग-नेमबाजी चा खेळाडू होता त्याला आपल्या खेळाचे गुण धर्म आपल्या क्षत्रुला दाखवण्या पूर्वीच त्याला भ्याड हल्ल्यात जीव गमवावा लागला असे क्रीडा क्षेत्रातील फारूक शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केल्या.
दुसरा आमचा शहीद जवान नागपूर काटोल येथील भूषण सथाई लाही आपला जीव गमवावा लागला व तो शाहिद झाला त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सुद्धा मुस्लिम मानियार बिरादरी सहभागी आहेत. त्या भ्याड हल्ल्याचा त्रिव निषेध सुद्धा बिरादरी तर्फे करण्यात आला.
राज्य शासनाचे आभार
जळगाव जिल्हा मानियार बिरादरी ने मागील सात महिन्यापासून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत वारंवार निवेदने दिली होती एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे गृहमंत्री जळगावी आले असता त्यांची फारूक शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडल्या बद्दल शासनाचे आभार व्यक्त केले तसेच मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ पहिल्यापासून नमाज पढण्याची अनुमति दिली होती त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
बिरदारीच्या कार्यालयात दुआ करतांना हाफिज अब्दुल रशीद,सोबत फारूक शेख, सादिक मुसा, मुंबईहून आलेले डॉ इम्रान सलीम,सैय्यद चाँद, सलीम शेख,हारून महेबूब, मोहसीन युसूफ,मुजाहिद खान,अब्दुल रउफ, आसिफ पटेल, रफिक मजीद, अख्तर शेख,रहेमतुल्ला शेख यांची उपस्थिती होती.