भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशात खरगोन येथे 50 फूट उंच पुलावरून नदीत बस कोसळल्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बस शारदा ट्रॅव्हल्सची असून खरगोनहून इंदौरला जात होती. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. खरगोनहून ही बस इंदूरला जात होती. बस पुलावर आली असता नियंत्रण सुटून रेलिंगवर आदळली. त्यानंतर संरक्षक कठडा तोडून बस नदीत कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. 15 जणांचा मृत्यू तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असून खरगोन बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली.