जळगाव (प्रतिनिधी) थंडीच्या कडाक्यात चार जणांचा जळगावात (Jalgaon) मृत्यू झाल्याचा होता. परंतु, त्या चौघांचा मृत्यू हा वेगवेगळ्या आजारातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भीक मागून उदरनिर्वाह करत असलेले ते वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले होते. शहरातील पांडे डेअरी चौक, निमखेडी रस्ता, रेल्वे स्टेशन व जिल्हापेठ परिसर अशा ठिकाणी चौघे बेघर आढळून आले. त्यांचा मृत्यू हा वाढलेल्या थंडीमुळे झाल्याच प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानुसार त्यांचे मृतदेह शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात नेले होते. तेथे त्यांचे आज शवविच्छेदन झाले.
शवविच्छेदनात स्पष्ट
जळगवात वाढलेल्या गारठ्यात चौघे बेघर सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. यात चौघांचा मृत्यू हा थंडीने झाला नसून फुफ्फूस, लिव्हरचे आजार असल्याचे स्पष्ट झाल्याचे वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.