हाथरस (वृत्तसंस्था) येथील बुलगढी गावात 19 वर्षांच्या दलित मुलीवर सामुहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यू प्रकरणी गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरण्यातील मुख्य आरोपीने 7 ऑक्टोबरला तुरुंगातून हाथरसच्या एसपींना पत्र लिहिले असून ते आज समोर आले आहे. संदीपने स्वतः ला आणि इतर तीन आरोपींना निर्दोष असल्याचे सांगत पीडितेची आई आणि तिच्या भावावर गंभीर आरोप लावले आहेत.
संदीपने म्हटले, ‘मुलीसोबत त्याची मैत्री होती. हे तिच्या कुटुंबाला पसंत नव्हते. घटनेच्या दिवशी मी तिथेच होतो, मात्र मला मुलीच्या आई आणि भावाने घरी पाठवून दिले होते. नंतर मला आरोपी बनून तुरुंगात पाठवण्यात आले. मुलीला तिचा भाऊ आणि आईने मारहाण केली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला.’ संदीपने निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. लेटरवर इतर आरोपी, रवी, रामी आणि लवकुश यांचे नाव लिहिले आणि अंगठा लावण्यात आला आहे.
पत्रात संदीपने लिहिले –
संदीपने लिहिले, ‘मला 20 सप्टेंबर रोजी खोट्या केसमध्ये तुरुंगात पाठवले. माझ्यावर आरोप लावण्यात आला की, मी गावातील मुलीसोबत वाईट कृत्य आणि मारहाण केली होती, यानंतर तिचा मृत्यू झाला. या खोट्या केसमध्ये वेगवेगळ्या दिवशी गावातील तीन इतर लोक लवकुश, रवी आणि रामूला तुरुंगात पाठवण्यात आले. ते माझे नात्याने काका आहेत. पीडिता गावातील चांगली मुलगी होती, तिच्यासोबत माझी मैत्री होती. भेटीसोबतच तिचे आणि माझे कधी-कधी फोनवरही बोलणे होत होते, मात्र आमची मैत्री तिच्या कुटुंबियांना पसंत नव्हती. घटनेच्या दिवशी तिची आणि माझी शेतात भेट झाली होती. तिच्यासोबत आई आणि भाऊदेखील होते. ती म्हणाल्या नंतर मी माझ्या घरी गेलो आणि वडिलांसोबत प्राण्यांना पाणी पिण्यास दिले. यानंतर मला गावातील लोकांकडून कळाले की, माझ्यासोबतच्या मैत्रीमुळे तिला तिची आई आणि भावाने मारले होते, यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिचा मृत्यू झाला. मी पीडितेला कधीच मारहाण आणि चुकीचे काम केलेले नाही. या प्रकरणी मुलीची आई आणि भावाने मला आणि तीन इतर लोकांना खोट्या आरोपांमध्ये फसवून तुरुंगात पाठवले आहे. आम्ही सर्व जण निर्दोष आहोत. कृपया, या प्रकरणाचा तपास करुन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा.’
तुरुंगात जीवाला धोका असल्याचे सांगितले
याच काळात आरोपींच्या कुटुंबीयांनी तुरुंगात आपल्या मुलांच्या जीवास धोका असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आमचे मुलं तुरुंगात सुरक्षित नाहीत. आरोपी रामूच्या वहिणीने म्हटले की, तुरुंगात नेते भेटण्यासाठी जात आहेत. असे म्हटले जाते की, तुरुंगात सुरक्षा असते, मात्र माझ्या मुलांना तुरुंगात धोका आहे.