जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या तिन्ही कायद्याच्या प्रती ची होळी भारत बंदच्या या वेळी जळगाव शहरातील सुभाष चौक येथे विविध पक्षांचे राजकीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या साक्षीने होळी करून आपला निषेध नोंदविला.
सर्वप्रथम बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी त्या कायद्यांचं थोडक्यात वाचन केले. काळे कायदे रद्द करा अशी मागणी केली. तसेच ही मागणी मंजूर होईपर्यंत या कायद्याच्या पुस्तकांची होळी वारंवार करत राहू असे सुद्धा अभिवचन दिले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे गफ्फार मलिक, वाल्मिक पाटील, शिवसेनेचे विष्णू भंगाळे, समाजवादी चे रईस बागवान, काँग्रेसचे जमील शेख, माजी आमदार मनीष जैन, एम आय एम चे झिया बागवान, काद्रिया फौंडेशन चे फारूक कादरी, फहिम पटेल, अमन फौंडेशन चे सैयद शाहिद, तसेच मानियार बिरादरीचे अब्दुल रउफ, हरीश सय्यद, मोहसीन युसूफ, मुजाहिद खान, अखतर शेख, रफिक शेख, मुस्तकीम मुसा, तनविर करीम, मोहसीन शाह आदींची उपस्थिती होती.