भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वरणगाव येथे जुन्या वादातून एका तरुणावर चौघांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना काल रात्री घडली होती. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील आंबेडकर नगरमध्ये रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जुन्या वादाची कुरापत काढून येथील रहिवाशी सचिन युवराज मगरे (वय २८) असलेल्या तरुणास चौघानी धारदार शस्त्राने वार वरून खुन केल्याची घटना सोमवारच्या रात्री घडली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळ्या जवळील महालक्ष्मी सॉमीलच्या समोर ही घटना घडली असुन पोलीसांनी या प्रकरणी चौघा संशयितांना अटक केली आहे. या खुनामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून मयत व आरोपींमध्ये मध्यंतरी वाद झाला होता. हा वाद मिटला असला तरी काल रात्री यातूनच सचिन मगरे याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.