कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील सलून व्यवसायास लॉकडाउनची नियमात शिथिलता आणून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी संत सेना महाराज नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने एरंडोल प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
मागील वर्षी लॉकडाउनमुळे पूर्ण एक वर्ष नाभिक समाज बांधव यांचे सलून दुकाने बंद होती. त्यामुळे समाज बांधव यांची व सर्व परिवाराची उपासमार झाली. कसे तरी त्यांनी एक वर्ष काढले. त्यात परत एक महीना दुकाने बंद झाली तर नाभिक बांधव खाइल काय व परिवाराला खाऊ घालेल काय हा मोठा प्रश्न आहे. समाज बांधव यांचा सर्व परिवार हा सलून व्यवसाय वर अवलंबून असतो. तरी प्रशासनाने सहानुभूति पूर्वक विचार करून समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात व सलून दुकाने उघळी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करीत आहोत.
सदर लॉकडाउनमध्ये गोर गरीब नाभिक समाजानाच का टार्गेट केले जाते, नाभिक समाजाची दुकाने बंद असल्यामुळे त्यांच्या जवळ कोणताही पर्यायी व्यवसाय नाहीये. तसेच सर्व समाज हा बिन शेती धारक असल्याने उत्पन्नाची साधनेही त्यांच्याकडे नसल्याने त्यांना सलून दुकाना व्यतिरिक्त कोणताही आर्थिक पर्याय नसल्याने परिवाराचा उदार निर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न आहे. आपण दिलेल्या नियमावली नुसार आम्ही आमचे दुकाने संपूर्ण सॅनीटायझर करून घेतो. तसेच प्रत्येक ग्राहकाला नवीन रुमाल, अप्रोन, व सर्व साहित्य हे नवीन ग्राहकाला सानी सॅनिटाईज करून वापरतो, अशा प्रकारे स्वत:ची तसेच ग्राहकाची काळजी आम्ही पार पाडतो, कृपया आमच्या परिवाराचा सहानुभूती पूर्वक विचार करून लॉकडाउनचा नियमात आमच्या व्यवसायात शिथिलता आणून आम्हाला सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी कासोदा नाभिक समाजाचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, सुरेश ठाकरे, अजय निकम, बंटी ठाकरे, गोपाल देवरे, विजय निकम आदी उपस्थित होते. सदर निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आले.