भुसावळ (प्रतिनिधी) दिवाळी, छटपूजेसाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबई येथून बनारस, दानापूर, समस्तीपूर, प्रयागराज, गोरखपूर येथे जाण्यासाठी सहा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या ३२ फेऱ्या होतील. यामुळे दिवाळी, छठपूजेच्या काळात प्रवाशांची जागेसाठी होणारी गैरसोय दूर होईल. भुसावळ विभागातील नाशिक, भुसावळ, खंडवा येथे या गाड्यांना थांबे आहेत.
नियोजनानुसार एलटीटी मुंबई- बनारस विशेष गाडीच्या चार फेऱ्या होतील. ही गाडी ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता बनारसला पोहोचेल. तर परतीचा प्रवास ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात बनारस येथून रात्री ८.३० वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता ही गाडी एलटीटीईला पोहोचेल. एलटीटी- दानापूर गाडीच्या ८ फेऱ्या होतील.
२६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी आणि सोमवारी ही गाडी एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता दानापूरला पोहोचेल. तर २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत रविवार आणि मंगळवारी ही गाडी दानापूर येथून सायंकाळी ६.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता एलटीटीला येईल.
या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच एलटीटी- समस्तीपूर गाडीच्या ४ फेऱ्या होतील. ३१ ऑक्टोबर व ७ नोव्हेंबरला दुपारी १२.१५ वाजता एलटीटीहून सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समस्तीपूरला येईल. तर १ व ८ नोव्हेंबरला समस्तीपूर येथून रात्री ११.२० वाजता सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता एलटीटीला येईल. एलटीटी प्रयागराज गाडीच्या ४ फेऱ्या होतील.
२९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबरला एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटलेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता प्रयागराजला पोहोचेल. तर पुणे- गोरखपूर विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होतील. २५ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला ही गाडी पुणे येथून दुपारी ४.१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता गोरखपूरला येईल. परतीचा प्रवास २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरला गोरखपूर येथून रात्री ११.२५ वाजता सुरु होईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पुण्यात येईल.