धरणगाव (प्रतिनिधी) किरकोळ वादातून तिघांना मारहाण झाल्याची घटना शहरातील पारधी वाड्यात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात विकास शांताराम पारधी (वय २१, रा. पारधी वाडा,पारोळा नाका) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २७ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरुन सुरेश बारकु पवार यांने त्याच्या हातातील कळे व शुभम विजय पवार (दोन्ही रा. पारधी वाडा) याने हातात फायटर पंचने विकासच्या नाका तोंडावर मारहाण केली.
यावेळी विकासचे मामा रघुनाथ नामदेव पारधी व आई मालुबाई हे भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांना सुध्दा दोघं संशयित आरोपींनी मारहाण करुन शिविगाळ केली. तसेच तुम्ही जर एकटे सापडले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भादवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. रामदास पावरा हे करीत आहेत.