मुंबई (वृत्तसंस्था) काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारा समीर वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे. एका आठवड्यात असं काय घडलं?, निश्चितरुपाने याने काही फर्जीवाडा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
आर्यन खान प्रकरणात तपास करणारा अधिकारीच आज न्यायालयात गेलेला असा उल्लेख करत नवाब मलिक यांनी वानखेडे यांनी फर्जीवाडा केल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केलाय. “या प्रकरणात तपास करणारा अधिकारीच आज कोर्टात गेला होता. मुंबई पोलिसांकडे तपास देऊ नये अशी त्यांची मागणी होती. कोर्टाने भूमिका घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी सांगितलं की यांना आम्हाला अटक करायची असेल तर ७२ तास आधी आम्ही यांना नोटीस देऊ. कालपर्यंत पोलीसांकडे गेले मला अटक करु नका म्हणाले. आज आता मग हायकोर्टात धाव घेतायत, असं म्हणत नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या या अर्जावरुन टीका केली.
पुढे बोलताना, “एक आठवड्याभरापूर्वी ते मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागत होते आणि आज मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. एका आठवड्यात असं काय घडलं?,” असा प्रश्नही नवाब मलिक यांनी विचारला आहे. “निश्चितरुपाने यांनी काही फर्जवाडा केलाय. त्यामुळे हा अधिकारी घाबरतोय आणि हीच सत्य परिस्थिती आहे,” असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.