TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चक दे इंडिया : भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास ; ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्यफेरीत मारली धडक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन उपांत्यफेरी अर्थात सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. दिग्गज समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला हॉकी संघावर भारतीय महिला संघाने १-० असा विजय मिळवला.

भारताच्या महिला हॉकी संघाने १९८० साली आपली सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला होता, त्यावेळी स्पर्धेत सहा संघ होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ आहे. आतापर्यंत १९८०, २०१६ आणि आता २०२१-२२ या तीन ऑलिम्पिक्समध्ये भारताने प्रवेश केला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगलाच रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, पण यावेळी त्यांना संधीचे सोने करता आले नाही. दोन्ही संघांनी सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. भारताने यावेळी उत्तम बचाव केल्याचेही पाहायला मिळाले. कारण ऑस्ट्रेलियाला यावेळी गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण भारताच्या उत्तम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. या सामन्यात पहिला गोल केला तो भारतीय संघाने. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला भारताने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती. भारताच्या गुरजित कौरने हा गोल केला होता.

पहिला गोल झाल्यावर काही वेळातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण भारताच्या मोनिका मलिकला यावेळी ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तिला मैदानातून बाहेर जावे लागले आणि भारतीय संघावर १० खेळाडूंनिशी खेळण्याची पाळी आली. पण त्यानंतरही सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती. त्यामुळे यापुढच्या ३० मिनिटांच्या खेळावर भारतीय संघ इतिहास घडणार की नाही, हे अवलंबून होते. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण यावेळी भारताचा बचाव उत्तम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या सत्रानंतरही भारताने आपली १-० अशी आघाडी कायम ठेवली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
क्रीडा

जळगाव बंगाली क्रिकेट टूर्नामेंट ‘चॅलेंज ट्रॉफी’ पर्व ५ : २९, ३० नोव्हेंबरला भव्य आयोजन

November 29, 2025
Next Post

अरे देवा ! ऑगस्ट महिन्यातच येणार कोरोनाची तिसरी लाट ; संशोधकांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी !

October 2, 2020

Today Horoscope: आजचं राशीभविष्य, मंगळवार १७ सप्टेंबर २०२४ !

September 17, 2024

मोटारसायकलने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात गुन्हा

March 27, 2022

सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा साठी 19 नोव्हेंबर पर्यंत अर्जाची मुदत

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group