संग्रामपूर (वृत्तसंस्था) तालुक्यातील पळशी शिवारात आज २३ जून रोजी दुपारीविजेच्या कडकडाट सह पाऊस सुर होता. या दरम्यान वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. जखमींवर शेगाव येथे उपचार सुरु आहेत. परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते.
पळशी येथील महिला सुशीला रमेश हेलगे यांच्या शेतात मधील असलेल्या विहिरीचे खोलीकरणाचे काम सुरु होते. आज राज्यात विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरू झाला. काम करणारे मजूर रवी संजय भालतडक वय ३२ व संजय उत्तमराव मारोडे वय ५० ,आणि मंगेश मनोहर बारब्दे वय ४०, नंदकिशोर मधुकर मारोडे वय ३९ रा. आहे.परळ येथील गट नं.२५ व २३ ह्या शेतात असलेल्या निंबाचे झाडाखाली आश्रयाला थांबले. एवढ्यात विजेचा कडकडाट होवून निंबाचे झाडावर वीज पडून यामध्ये रवी संजय भालतडक वय ३२ व संजय उत्तमराव मारोडे वय ५० यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मंगेश मनोहर बारब्दे वय ४०, नंदकिशोर मधुकर मारोडे वय ३३ हे दोघे जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतकाचे शवविश्चेदन करुन प्रेत नातेवाईकांचे ताब्यात देवून त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर घटनेची माहिती शेता शेजारील व गावातील नागरिक मदतीला धावून आले. जखमींना प्रथम संग्रामपूर प्रा,आ.मध्ये उपचारासाठी दाखल केले. डाॕक्टरांनी जखमींना पुढील उपचारासाठी शेगाव रेफर येथे दाखल केले. सदर घटनेचा संग्रामपूर महसुल विभागाचे कर्मचारी व तलाठी , मंडळ अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला आहे, या घटने मुळे पळशी गावात व तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
.