अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील भरवस आणि मांडळ येथे दोन तरूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडलीय. या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
भरवस येथील सुनील लोटन पाटील (वय ३५) या शेतकऱ्याने ३० रोजी रात्री ८ वाजता कापूस पिकावर फवारणीसाठी आणलेले तणनाशक प्राषन केले होते. खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना पहाटे त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.एम.पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. त्यानंतर भरवस येथे ३१ रोजी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी मनोज पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मांडळ येथील डिगंबर संतोष पाटील (वय ३५) ह्यांनी ३१ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास म्हाळसा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्वतःच्या खळ्यात निंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.