जळगाव (प्रतिनिधी) वेदांता महाराष्ट्राबाहेर गेला मग आदित्य ठाकरे काय मलिदा खायला मंत्री झाले होते का?, असा खोचक टोला भाजपा खासदार उन्मेश पाटलांनी लगावला आहे.
खासदार उन्मेश पाटील यांनी वेदांतावरून बोलतांना पुढे म्हणाले की, विरोधी पक्षात आल्यानंतर तरुणांच्या भावना भडकावून त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, असा कळवळा दाखवणं आदित्य ठाकरे यांनी बंद करावे. त्यापेक्षा सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांनी सेमी कंडक्टर पॉलिसी जर वेळेत आणली असती तर सेमी कंडक्टर इंडस्ट्री असणाऱ्या वेदांताला आपल्या राज्यात आणखी मदत मिळाली असती असं पाटील यांनी म्हटलं आहे. जेव्हा सत्तेत होते तेव्हा आदित्य ठाकरे यांच्याकडे पेंग्विन आणायला, परदेशात फिरायला घरी बसायला वेळ होता. आदित्य ठाकरेंनी कायदेमंडळाचे सदस्य असताना सभागृह चालवलं नाही. मग ते काय फक्त मलिदा खाण्यासाठी पर्यावरण मंत्री झाले होते का? असा देखील टोला खासदार उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तसेच एमआयडीसी जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याची देखील आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.