मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये राज्यात वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
राज्यातील काही भागात बुधवार रात्रीपासून वीआय (Vi) चे नेटवर्क गायब झाले आहे. विशेष म्हणजे पुणे आणि आसपास भागात वीआयच्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईत देखील काही ठिकाणी विआयचे नेटवर्क डाउन झाले आहे. याबाबत ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे ट्विटरवर वोडाफोन टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे. पुणे शहरात बुधवारी रात्री धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडले. रात्री नऊ ते अकरा या दोन तासात संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तशात आज नेटवर्क गेल्यामुळे पुणेकरांचे अडचणीत अधिकची भर पडली.