नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एमपीएसीची परीक्षा रद्द करतांना सरकारने एकाच जातीचा विचार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. एमपीएसीची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचे काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. मला जे बोलायचे ते मी बोलतो. मी एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.