मुंबई (वृत्तसंस्था) देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याला मनसेकडून विरोध केला जात आहे. तुमचे घाणेरडे प्रकरण बाहेर येतायेत म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारकडून कोरोनाचा बाऊ केला जातोय, कोरोनाच्या नावाखाली लोकांना भीती दाखवली जाते असा आरोप मनसेकडून सातत्याने केला जातोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मास्क वापरायच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून ते दाखवून दिलं आहे. तुमचे घाणेरडे प्रकरण बाहेर येतायेत म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? असे सवाल मनसेने राज्य सरकारला विचारले आहेत. सरकार जर एवढे जर कडक निर्बंध लावत असेल तर जनतेला काही सवलती देणार का? असाही सवाल मनसेने राज्यातल्या महाविकास आघाडीला विचारला आहे.
रुग्ण संख्या कमी झाल्यावर आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न अन्…
कोरोना रुग्ण संख्या कमी होते तेंव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार अशी बोचरी टीका मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर केली आहे. जनतेने काम करायचे नाही का ? सरकारने कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायच का? असाही सवाल मनसेकडून केला गेलाय.