जळगाव (प्रतिनिधी) अमरावती ग्रामीण पोलीस आयोजीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात शनिवारी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी मोकळा सवांद साधला. करिअर म्हणजे काय ? ते कसे निवडावे. स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे.आयुष्यातील ध्येय कसे ठरवावे अश्या अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातूनही त्यांनी विद्यार्थ्यांना बोलत करून त्यांच्या अडचणी, इच्छा जाणून घेतल्या.
अमरावती जिल्यातील चिखलदरा येथे महाराष्ट्र वन प्रशिक्षण संस्था येथे तर धारणी येथे बालाजी मंगल कार्यालयात सदर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमासाठी एकताई, हातरू, तसेच टेंम्बुरसोंडा या दुर दुर्गम भागातुन ३ ते ४ तासांचा प्रवास करून विद्यार्थी आवर्जुन उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मोठ्याप्रमाणावर युवक आणि युवती सहभागी झाले.
सदर कार्यक्रमास पोलीस जिल्हा अधिक्षक डॉ.हरी बालाजी, पोलीस निरीक्षक शिवाजी रुपनार, बेलखडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक शिक्षक आणि सामाजीक कार्यकर्ते छोटू काका वरणगावकर उपस्थित होते.