मंत्रीपदावरून वाद झाल्याबाबत जळगावचे तिघं आमदार म्हणतात…!
मुंबई (वृत्तसंस्था) बंडखोरीमुळे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटात 40 पेक्षा जास्त आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत. परंतू दोन बंडखोर आमदारांनी गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये चांगलाच राडा घातला आहे. या दोन आमदारांमध्ये तुफान हाणामारी मारामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे जळगावच्या दोन आमदारांमध्ये देखील वाद झाल्याची चर्चा रविवारी सुरु होती. परंतू या वृताचे जळगावच्या तिन्ही आमदारांनी खंडन केले आहे.
एकनाथ शिंदे हे विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतल्यापासून गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण अधिक गतीने सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे हे आमदारांसह हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये थांबले आहेत. याच हॉटेलमध्ये दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर आणि अन्य एका आमदारांमध्ये ही मारामारी झाली आहे. त्यानंतर लगेचच बंडखोर गटाच्या वतीनं खुलासा करण्यात आला असून असा प्रकारचं कुठलंही कृत्य आमदारांकडून घडलेलं नसल्याचं जाहीर कऱण्यात आलं आहे. या मारामारीचे वृत्त माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी फेटाळले आहे. अबीटकर या पूर्वी नाराज होते. मात्र आता ते नाराज नाहीत. रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये सगळं काही व्यवस्थित असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
मंत्रीपदावरून वाद झाल्याबाबत जळगावचे तिघं आमदार म्हणतात…! दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात सामील झालेल्या दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची जोरदार चर्चा रविवारी सकाळपासून सुरु होती. अगदी धक्का-बुक्की पर्यंत गोष्ट गेल्याचे बोलले जात होते. परंतू जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील आणि किशोर पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितले. काही अफवा पसरवल्या जात आहे. परंतू आम्ही शिवसैनिक म्हणून एकत्र आहोत. मंत्रीपदावरून कोणतीही चर्चा याठिकाणी झाली नसल्याची प्रतिक्रिया आ. चिमणराव पाटील यांनी दिली आहे. तर आ. किशोर पाटील म्हणाले की, वाद झाल्याची माहिती मी तुमच्याकडून ऐकत असून याठिकाणी कोणताही वाद झालेला नाही. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आमदारांमध्ये कोणताही वाद नाही. या फक्त अफवा आहेत. सोशल मीडियात कुणी काही टाकले की, तेच सगळीकडे व्हायरल होत असते.