जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रावेर येथे होणाऱ्या सततच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ५ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेवून २० सप्टेंबर २०२० पासून १ वर्षाकरीत मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे उपद्रवी लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडालीय.
मागील वर्षापासून रावेर शहर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील ठरत आहे. जातीय दंगलीने रावेरची प्रतिमा जिल्ह्यासह राज्य डागाळली होती. त्यामुळे दंगलीच्या घटनांना आळा बसावा. यासाठी पोलिसांनी काही उपद्रवी लोकांची यादी तयार केली होती. शहरात शांतता अबाधित रहावी यासाठी पाच जणांना एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पाठविला होता. जिल्हाधिकारी श्री. प्रस्तावास मंजुरी देताच पाचही जणांना एक वर्षासाठी स्थानबंध करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले.
स्थानबध्द करण्यात आलेल्यांची नावे
मधुकार उर्फ मधु पैलवान रामभाऊ शिंदे (वय-६२ रा. शिवाजी चौक, रावेर), स्वप्निल मनोहर पाटील (महाजन) (वय-२६ रा. बक्षिपुर ता.रावेर), शेख मुकबुल अहमद शेख मोयीउद्दीन (वय-५७ रा. मन्यारवाडा रावेर), शेख कालु शेख नुरा (वय-५३ रा. मन्यारवाडा रावेर) आणि आदिलखान उर्फ राजू बशिरखान (वय-२२ रा. फुकटपुरा रावेर)
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या सुचनेनंतर पोलीस अधिक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, पो.नि. रामदास वाकोडे, सपोनि शितल नाईक, पोउनि संदीप पाटील, मनोज वाघमारे, पो.शि. दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरीख् पोना. महेश महाजन, स.फौ. राजेंद्र करोडपती, विजय जावरे, पो.ना. नंदू महाजन, महेंद्र सुरवाडे, ज्ञानेश्वर चौधरी, तुषार मोरे, सुरेश मेढे, जितेंद्र पाटील, मंदार पाटील, पुरूषोत्तम पाटील, मनोज म्हस्के, निलेश लेहार, इस्माईल शेख, भरत सोपे, नितीन झांबरे, जितेंद्र जैन यांना संबंधितांच्या दाखल गुन्ह्याची माहिती संकलित करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे अहवाल रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारींनी आदेश पारित केले. त्यानंतर पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेवून २० सप्टेंबर २०२० पासून १ वर्षाकरीत मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.
.