नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पतीच्या मृत्यूनंतर बहिणीचा भावावरच जीव जडला. एवढेच नव्हे तर पंचायतीसमोर मावस भावासोबत लग्नासाठी अडून बसल्याची घटना बिहारच्या पश्चिमी चंपारण जिल्ह्यातील बानूछापरमध्ये घडली आहे.
चंदा असं या तरुणीचं नाव असून ती आपला मावसभाऊ सुनील कुमारच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट तिने धरला आहे. घरच्यांसह गावातील लोकांना जेव्हा बहिण-भावाच्या प्रेमप्रकरणासह लग्न करणार असल्याबाबत समजलं तेव्हा त्यांनीही यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही कुणाचंच ऐकलं नाही. अखेर दोघांनाही शिक्षा देण्यासाठी गुरुवारी रात्री पंचायत बोलावण्यात आली.
पंचायतीतही त्यांना शिक्षा देण्याचा निर्णय झाला. पण तरुणीने आपलं लग्न व्हावं यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून मदत मागितली. परंतू पंचायतीने या बहीण-भावांचं लग्न न लावून देण्याचा आदेश दिला आहे. पण या तरुणीने सर्वांसमोर काहीही झालं तरी ती आपल्या भावाशी लग्न करणार असल्याचं सांगितलंय. तरुणीच्या पतीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यामुळे ती एकटी पडली होती. या एकटेपणात ती आपल्या मावसभावाच्या जवळ आली. त्याच्या प्रेमात पडली आणि आता तिला त्याच्याशी लग्नही करायचं आहे. बानुछापर पोलीस ठाण्यातही याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जमावापासून वाचवून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. चंदा सुनीलपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचं आहे.