जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज अवघे ४० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे आज ७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर तब्बल आठ तालुक्यात एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाहीय.
जळगाव शहर –०२, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ- ०५, अमळनेर- ००, चोपडा-०२, पाचोरा-०८, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-१६, रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ४० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५३ हजार ६२९ पर्यंत पोहचली असून ५१ हजार ८३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आतापर्यंत १२७२ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ५२७ रुग्ण सध्या उपचार घेताय.
















