रावेर (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या हत्याकांडामुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे.
रावेर शहरालगत अंतरावरील बोरगाव शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात मागील अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते. तर बोरगाव येथे दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. आज सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पहिले असता, त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण घरात दोन मुली व दोन मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यात सईता (वय 12 वर्ष) रावल (वय 11 वर्ष ) अनिल (वय 8 वर्ष) आणि सुमन (वय 3 वर्ष) एकटीच राहत होती. मोठी मुलगी सईता ही सर्वांची देखभाल करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतर चारही भावंडांची : कुऱ्हाडीने वार करत चार भावंडांची निर्घुण हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रावेर पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे. तर घटनास्थळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पोहोचले आहेत.















