जळगाव (प्रतिनिधी) नियोजित बैठका असल्यामुळे जामनेर येथील कार्यक्रमाला जावू शकणार नसल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगीतले. ते शासकीय विश्रामगृहात पत्रकांसोबत बोलत होते.
पाणीपुरवठा व इतर बैठका असल्यामुळे मी जामनेरच्या कार्यक्रमाला जावू शकणार नाहीय. राहिल्या त्यांच्या पत्रिकेचा विषय…तो माझा विषय नाहीये. त्यांनी खडसे यांना बोलवायचे की नाही, हा माझा विषय नाहीये. त्यांनी ,आला बोलावलं होतं पण जाऊ शकत नाहीये. त्यामुळे त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे, त्यापेक्षा त्याच्यामध्ये उद्देश कसा आहे याला महत्त्व देणारा मी माणूस आहे. मला तरी वाटते की दवाखान्याचा कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे, अशी प्रतिक्रिया ना. पाटील यांनी दिली आहे.