शिरसोली (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यात शिरसोली प्र.बो. येथे तीन दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्यानंतर एकाच कुटुंबातील नवरदेवसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, अशी माहिती शिरसोली आरोग्य प्रशासकीय यंत्रणेकडून मिळाली आहे.
पुणे येथे एका खासगी कंपनीत काम करणार्या आणि मूळ शिरसोली गावातील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा १६ तारखेला जळगाव शहरातील युवतीशी विवाह पार पडला होता. १८ रोजी नवरदेवासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली. त्यानुसार शनिवारी २० फेब्रुवारी रोजी संबंधितांची कोरोना चाचणी केली असता, यात नवरदेवासह पाचही जणांन कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. असे शिरसोली आरोग्य प्रशासनाकडून सागण्यात आले.
या लग्नात दोनशे ते तीनशे वर्हाडींनी हजेरी लावली होती ,याच गर्दीतून नवरदेव आणि त्याच्या परिवाराला कोरोनाची लागण झाल्याचेे समोर आले आहे, विवाहाच्या दुसर्या आणि तिसर्या दिवशी नवरदेव सह त्याच्या परिवाराला कोरोनाची लक्षणे आढळून येताच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या परिवाराला लग्नाच्या तिसर्याच दिवशी उपचारासाठी हाँस्पिटलमध्ये भरती व्हावे लागल्याने चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. विवाह समारंभ अतिशय मर्यादित संख्येत साजरे करण्याचा आवाहन शासनाचावतीने करण्यात येत आहे. मात्र त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असल्याने त्याचाच परिणाम म्हणून अशीही घटना समोर आली आहे, शासनाच्या निर्देशक सूचनांचे जनतेने पालन करणे गरजेचे आहे.