मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात काल ४ हजार ३४२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
काल दिवसभरात राज्यात ४ हजार ३४२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ७५५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, ५५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अजुनही पूर्णपणे ओसरलेली नाही, अद्यापही रोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येत भर पडतच आहे. राज्यात आजपर्यंत ६२, ८१, ९८५ रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतली आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,७३,६७४ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७५५१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के आहे.
राज्यात कालपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या ५,४३,२७,४६९ नमुन्यांपैकी ६४,७३,६७४ नमूने पॉझिटिव्ह (११.९२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८७,३८५ जण गृहविलगीकरणात आहेत आणि १ हजार ९७१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. याशिवाय, राज्यात आज रोजी ५०,६०७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.