नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आंध्रप्रदेशातील वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेममध्ये (Akkireddygudem) एका केमिकल मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना विजयवाडा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
केमिकल फॅक्ट्रीतील दोन मजले आगीच्या भक्ष्यस्थानी आले. इथे 17 कर्मचारी काम करत होते. या आगीच्या घटनेत मृत्यू झालेले अधिकतर लोक बिहारचे राहाणारे आहेत. हे सर्व जण वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील पोरस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करत होते. वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितलं, की पोरस केमिकल फॅक्ट्रीमध्ये बुधवारी लागली. या फॅक्ट्रीमध्ये पॉलिमर बनवण्याचं काम केलं जातं. आगीच्या कारणाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु ही घटना गॅस पाइप तुटल्याने किंवा गळती झाल्याने होऊ शकते असा अंदाज आहे. आग लागल्यानंतर काही तासांनी आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 11 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये मदत जाहीर
केमिकल फॅक्ट्रीमध्ये आगीच्या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनीही केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.