जळगाव (प्रतिनिधी) शहरा लगत असलेल्या कुसुंबा गावाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन किरकोळ जखमी झाले आहेत. गजानन किसन बावस्कर (वय ३२) आणि लिलाबाई धोंडू सोनार (वय५५ चिंचखेडा ता. जामनेर) अशी मयतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिंचखेडा ता. जामनेर येथील रहिवासी लिलाबाई धोंडू सोनार यांना मुतखड्याचा त्रास होत होता. यामुळे त्यांचा मुलगा बाळू धोंडू सोनार याने जळगाव येथील इएसआयसीच्या कार्यालयात येण्याचे ठरविले. यानुसार आज तो आपला मित्र गजानन व पत्नी आणि मुलासह आज जळगावला आला होता. येथील काम आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास हे सर्व जण दोन दुचाकींवरून घरी परत जात असताना कुसुंबा गावाजवळ जळगाव-सोयगाव या भरधाव वेगाने धावणार्या बसने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. यामध्ये एका दुचाकीवर स्वार असणारे गजानन किसन बावस्कर (वय ३२) आणि लिलाबाई धोंडू सोनार (वय५५ चिंचखेडा ता. जामनेर) हे जागीच ठार झाले. तर दुसर्या दुचाकीलाही बसने धडक दिली. यात बाळू धोंडू सोनार, त्यांची पत्नी सुनीता आणि योगेश हे किरकोळ जखमी झाले.