धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जुनी पाईप लाइन बदलवून नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. जर गावात नाविन जलवाहिनीचे काम सुरु होणार आहे. तर मग शहरात रस्ते बनवून आणि पेव्हर ब्लॉक बसवून शासनाचे आर्थिक नुकसान का?, असा सवाल भाजपने उपस्थीत केला आहे. एवढेच नव्हे तर ही सर्व कामे तात्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा शासनाच्या आर्थिक नुकसानीस पालिका प्रशासन कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.
भारतीय जनता पार्टीने मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याकडे आज केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील जुनी पाईप लाइन बदलवून नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरू होणार असून त्यासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आल्याची माहिती दिली होती. परंतू दुसरीकडे शहरात सर्वत्र रस्ते,पेव्हर ब्लॉकचे काम सुरू आहे. नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरु होणार असेल तर सदरील कामे व विचाराधीन कामे त्वरीत थांबविण्यात यावीत. कारण जलवाहिणी बदलविण्याचा कामांमुळे शहरातील सर्व रस्ते खोदण्यात येतील. त्यामुळे नवीन होत असलेली रस्ते,पेव्हर ब्लॉकचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शासनाची आर्थिक हानी होईल. हि कामे करून पालिकेतील सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक हे स्वतःचे आर्थिक हित जोपासत असून शासनाचे नुकसान करीत आहेत. सदरची कामे थांबविण्यात यावी. तसे न झाल्यास होणाऱ्या शासनाच्या आर्थिक नुकसानीस संबंधीत प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक हे कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशारा भाजपने दिला आहे.
म.गांधी उद्यानातील झाडे भाजप तोडू देणार नाही
11 मे रोजी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने 38/2021या जाहीर नोटिसवरून सूचित केले की, चोपडा रोडवरील महात्मा गांधी उद्यान विकसित करणेकामी उद्यानातील १९ झाडे अडसर ठरत असल्याकामी तोडण्यात येणार आहेत. एकीकडे उद्यानात झाडे लावून शोभा वाढविली जाते. मग आपण झाडे तोडण्याचा जुलमी निर्णय कसा घेतला गेला?. सदरील वृक्षांची पाहणी केली असता ते मृत नसून काही जातीच्या झाडांची पाने ही पूर्णपणे झडतात व पाऊस आल्यावर त्यांना नविन पालवी फुटून बहर येतो. त्यामुळे नगरपरिषदेच्या म्हणण्या प्रमाणे उद्यानातील झाडे मृत आहेत, हे मान्य करता येणार नाही. सदरील झाडे जशाच तसे ठेऊन उद्यान विकसित करावें. अन्यथा झाडे तोडल्यास भारतीय जनता पार्टी संबंधितावर कायदेशीर कारवाई करेल.
सदर तक्रार अर्ज देते वेळी भाजप नेते शिरीषआप्पा बयस,तालुका उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक शरद धनगर,कडूअप्पा बयस,सुनील चौधरी, राजू महाजन, जुलाल भोई, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, योगेश महाजन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.