जळगाव (प्रतिनिधी) सासरवाडीहून परत येत असतांना दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याचा सोमवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. राजेंद्र गोपाळ तायडे (वय ५६, रा. मोहाडी), असे मयताचे नाव आहे.
राजेंद्र तायडे हे महालिकेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सासरवाडी असल्यामुळे ते दुचाकीने सासरवाडीला कामानिमित्त भेटीसाठी गेले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास ते दुचाकीने जळगावकडे येण्यासाठी निघाले. सायंकाळच्या सुमारास अजिंठा घाटाजवळ अंधारामुळे त्यांची दुचाकी स्लिप झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर मोहाडी गावातील नातेवाईकांनी धाव घेतली. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.