धरणगाव (प्रतिनिधी) हजरत सैय्यद, अहेमदशाह कमाली रहेमतुल्ला अलैह दमोह (डोंगर पीरबाबा) याबाबत वादग्रस्त गट क्र १२४८/०२ वन विभाग यांना सरकारने हस्तांतरीत केलेले आहे. याबाबत नाशिक अपर आयुक्तांनी नुकतेच आदेश दिले आहेत. परंतू या विरोधात आम्ही हायकोर्टात दाद मागणार असून तोपर्यंत कायदेशीर कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी आज तहसीलदार, पालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे धरणगाव मुस्लीम समाजाने एका निवेदान्द्वारे केली आहे.
शेख रफिक शेख मुसा व अध्यक्ष पंच मंडळ व मुस्लीम नागरीक रजरत सैय्यद, अहेमदशाह कमाली रहेमतुल्ला अलैह दर्भा (डोंगर पीरबाबा) यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अपर आयुक्त नाशिक यांच्या आरटीएस अपील क. ५६९/२०२१ च्या आदेशाबाबत आमच्यातर्फे अपील करण्यात येणार असून, त्याबाबत पुढील योग्यती कायदेशीर कारवाई करण्यास स्थगिती देण्यात यावी. नाशिक आयुक्त यांनी सदरचा अपीलाचा निकाल दि. ११ /१०/२०२२ रोजी दिलेला असून या अपीलाच्या आदेशाबाबत मला दि. २२/१०/२०२२ रोजी माहिती झाली. तसेच दि. ३०/१०/२०२२ पर्यंत न्यायालयीन कामकाजास व शासकीय विभागास सुटी असल्याने ३१/१०/२०२२ ते पुढील अपीलावी निकालाचा आदेश मिळेपावेतो म्हणजेच ३० किंवा ६० दिवसांच्या आत आम्हाला नाशिक आयुक्त याच्या आदेशाच्या विरोधात अपील करण्याकरीता कालावधी आहे.
तसेच अपील कालावधीच्या आत मा. न्यायालय/ मंत्रालय मुंबई यांच्याकडे देखील अपील करणार असुन त्या कालावधीपर्यंत म्हणजे अपीलावे मुदत असे पर्यंत व वरीष्ठ न्यायालय व मंत्रालय यांच्यापुढे येणारा आदेशापर्यंत नाशिक आयुक्त यांच्या अपीलाच्या निकाल व आदेषाप्रमाणे कोणतीही कार्यवाही करण्यात येवू नये. तसेच मुस्लिम धर्मातील लोकांचे भावना दुखावतील असा कोणताही प्रकार होवू नये तसेच गायरान बचाव मंच अध्यक्ष व सदस्य कोणताही त्याप्रकाराबाबत मोर्चा काढू नये व उपोषणाला बसण्याची परवानगी देवू नये. सदरची बाब ही न्यायप्रविष्ठ असल्याने व कायद्याचा भंग होवू नये व गंभीर विषय असल्याकारणाने महसुल विभाग शासन व पोलीस प्रशासन यांनी या बाबीची नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शेकडो मुस्लीम बांधवांच्या सह्या आहेत.