कोपरगाव (वृत्तसंस्था) लग्न सोहळ्यावरुन परतताना तालुक्यात समृध्दी महामार्गावर समोर चाललेल्या आयशर टेम्पोला क्रुझर जीपने मागून दिलेल्या जोरदार धडकेत १८ महिन्याच्या चिमुकलीसह पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दि. ३० जून रोजी रात्री १ वाजता कोकमठाण शिवारात हा अपघात घडला. दरम्यान, हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपल्यानं समाजमन सुन्न झाले आहे.
पती-पत्नीसह चिमुकलीचा जागीच मृत्यू !
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात शुक्रवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास आयशरने समृध्दी महामार्गावर टेम्पो क्रमांक (महा. २० सीटी ६६५६ ला) क्रुझर जीप क्रमांक (महा. २२ एच २५.२३ ने) दिलेल्या जोरदार धडकेत क्रुझर गाडीमधील पती संतोष अशोक राठोड (वय ३०), मुलगी अवनी संतोष राठोड (वय १८ महिने) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी वर्षा संतोष राठोड (वय २७ सर्व रा. नेर, ता. मंठा, जि. जालना) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अशी आहेत जखमींची नावे !
या अपघात शरद शिवाजी पवार (३६) रा. ककडा भानु नाईक तांडा पोस्ट नेर जि. जालना, एजाज सिराज पठाण (२४) रा. लोणार ता. लोणार जि. जालना, बलीबाई अशोक राठोड (५०), कृष्णा अशोकराव राठोड वय (२७), कोमल कृष्णा राठोड (१९), तिन्ही रा. गोसावी पांगरी ता. मंठा जि. जालना, नितीन राम पवार (२८) रा. मंठा जि. जालना, क्रुझर चालक रंजीत तुकाराम राठोड रा. महोदरी ता. मंठा जि. जालना हे सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे कुटुंब नेर येथून विरार मुंबईकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
असा झाला अपघात !
जालनाकडून काळाला मुंबईकडे जात असताना क्रुझर जीप चालकाच जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात समोर चाललेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी आयशर टेम्पो चालक पवार यांनी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली पांडुरंग राज असून सदर फिर्यादीवरून क्रुझर चालक रंजीत तुकाराम राठोड यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. किशोर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
भावाचा विवाहाला हजेरी लावून घरी परताना झाला अपघात !
संतोष हे मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी गावचे रहिवासी होते. मात्र सध्या मुंबईत बांधकाम सुपरवायझर म्हणून काम करत होते. विरार येथे सहकुटुंब राहात होते. संतोष राठोड आपल्या परिवारासह लहान भाऊ कृष्णाच्या लग्नासाठी जालना जिल्ह्यातील मूळगावी आले होते. 26 जूनला कृष्णा राठोड यांचे जालन्याजवळील एका गावात लग्न झाले होते. लग्नानंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यावर संतोष राठोड 29 जूनला आपल्या परिवारासह क्रूझर वाहनाने रात्री हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे कुटुंबासह जात असताना हा अपघात झाला. मृत तिघांवरही पांगरी गोसावी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्न होऊन दोनच दिवस झालेल्या कृष्णा राठोड (27) आणि त्याची पत्नी कोमल राठोड (19) हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. मृत संतोषची आई बताबाई अशोक राठोड (65) यांच्यावर उपचार सुरू आहेत.