जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची धोका पूर्व पातळी 213 मीटर असून आज (दि.10 सप्टेंबर) रोजी धरणाची पाणी पातळी 213.00 मीटर इतकी आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात झालेली असून पुढील 72 तासांमध्ये तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून अचानक पाणी प्रवाह सोडण्यात येऊ शकतो. तरी पुढील 72 तासापर्यंत हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापी नदीपात्रामध्ये जाऊ नये. असे हतनूर पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता महाजन यांनी कळविले आहे.