जळगाव (प्रतिनिधी) – जुन्या वादातून रसाल गमन राठोड (वय ४८, रा. जुना आसोदा रोड) यांना पाच जणांनी दारुच्या नशेत असतांना मारहाण केली. ही घटना दि. १० मार्च रोजी स्मशानभूमी परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून पाच जण सुनील रसाल राठोड याला शोधत होते. त्या वेळी त्याचे वडील रसाल राठोड हे दिसल्याने त्यांना एका जणाने ‘तुझा मुलगा सुनील कोठे आहे, आज मी त्याला मारुन टाकेल’, असे म्हणत धमकी दिली. तसेच पाच जणांनी मारहाण केली. या प्रकरणी रसाल राठोड यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या हिमांशू नवीन साखला, प्रशांत उर्फ गौरव गोपाल चौधरी, अक्षय विलास तायडे (तिघ रा. कासमवाडी), कृष्णा नंदू सुर्यवंशी (रा. पिवळ्या भिंतीजवळ) व अन्य एक संशयित अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे करीत आहेत.
आणखी दोघांना पोलिसांकडून अटक प्रौढाला मारहाण केल्यानंतर चार जणांपैकी दोघांना यापुर्वीच अटक करण्यात आली होती. तर उर्वरीत दोघ हे पसार झाले होते. शनिपेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित अक्षय विलास तायडे व कृष्णा नंदू सूर्यवंशी या दोघांना बुधवारी अटक केली असून उर्वरीत एक संशयित मात्र अद्याप फरार आहे.
















