मुंबई (वृत्तसंस्था) विरोधकांकडून सचिन वाझे यांचं नाव या प्रकरणात सातत्याने येत आहे यावर आता गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. ‘सचिन वाझे आता या प्रकरणाचा तपास करत नसून पीएसआय नितीन अलंकुरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का?, असा सवाल गृहमंत्र्यानी विरोधकांना केला आहे. गृहमंत्र्यांच्या या प्रश्नांवर सभागृहात काही काळासाठी गदारोळही झाला.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी काळंबेरं असल्याचं सांगत, मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात फोनवरुन संवाद होत असल्याचा दावा केला. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का, असा प्रतिसवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला.
विरोधकांकडून सचिन वाझे यांचं नाव या प्रकरणात सातत्याने येत आहे यावरही गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. ‘सचिन वाझे आता या प्रकरणाचा तपास करत नसून पीएसआय नितीन अलंकुरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का?, असा सवालही गृहमंत्र्यानी विरोधकांना केला आहे. अन्वय नाईक प्रकरणी सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींवर कारवाई केली होती,’ असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर निवेदन देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, “स्कॉर्पिओ गाडीचे मूळ मालक सॅम पीटर न्यूटन होते. त्यांनी इंटिरिअरसाठी दिली होती. पैसे दिले नाहीत म्हणून ही गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर इथे सापडला, त्यांच्या शरीरावर कोणतीही दुखापत नव्हती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समजेल. ठाणे पोलीस याचा तपास करत आहेत.”
सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात फोनवरुन संवाद : देवेंद्र फडणवीस
मनसुख हिरेन यांनी जबाबात म्हटलं आहे की, घरगुती वापराकरता ती मी गाडी विकत घेतली. त्याचं स्टेअरिंग जॅम झालं, त्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले? सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. जो या प्रकरणातला दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे. मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत असं कोणी आत्महत्या करत नाही. इतके योगायोग होत नाहीत. तात्काळ हे प्रकरण एनआयएकडे दिलं पाहिजे, असं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत असल्याचं सांगत कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले.
खालच्या स्तरावर जाऊन गृहमंत्र्यांचं उत्तर
गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. “इतक्या खालच्या स्तरावर जाऊन उत्तर देणं हे गृहमंत्र्यांना न शोभणारं. कोणतीही उत्तरं नसल्यावर अशी वक्तव्ये केली जातात. एक गोष्ट लक्षात आली की आम्ही इतके पुरावे दिले की गृहमंत्री निरुत्तर झाले. त्यांनी भटकवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल अयशस्वी झाला आहे,” असं देशमुख म्हणाले.