चाळीसगाव (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर च्या दिवशी अनेक हौसे गवसे गड-किल्ल्यांवर दारु मटणाच्या पार्ट्या करतात. आणि गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करतात. याला आळा बसावा म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरदे यांना आज निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य अविरतपणे करत आहोत. तसेच गड किल्ले हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी पवित्र स्थळे आहेत. या गड किल्ल्यांवर अनेक मावळ्यांनी आपला पराक्रम गाजवलेल्या असून अनेकांनी या गडकिल्ल्यांवर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अनेक सरदार मावळे राजे राजपुत्र यांच्या समाध्या या गडकिल्ल्यांवर आहेत. तसेच अनेक पवित्र देव देवतांची देवळे देखील आहेत. अशा या गडकिल्ल्यांचे पावित्र्य कायम अबाधित राहावे, अशी आमची नेहमी अपेक्षा आणि भूमिका राहिलेली आहे. मात्र समाजातील काही अज्ञान आणि भिबस्त संस्कृतीचे तिरस्कार करणारे लोक ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी गड-किल्ल्यांवर दारु मटणाच्या पार्ट्या करण्याचे आयोजन करतात. तसेच दंगामस्ती करून गड-किल्ल्यांचे पवित्र भंग करण्याचे काम या लोकांकडून होते. म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्री चाळीसगाव तालुक्यातील कन्हेरगड (पाटणादेवी), मल्हारगड (कन्नड घाट), राजदेहरे किल्ला (राजदेहरे) या किल्ल्यांवर किंवा पायथ्याशी पोलीस गस्त असावी, आणि अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक स्वतः या किल्ल्यांवर जाऊन अशा लोकांना अशा पार्ट्या न करून त्यांचे पवित्र राखण्याचे आव्हान करणारच आहेत. मात्र पोलीस गस्त आणि पोलिसांची कारवाई ही यावेळी झाल्यास अधिक योग्य होईल, आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यास मदत होईल, असे या निवेदनाद्वारे कळविल्यात आले आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, विवेक रणदिवे, शुभम चव्हाण, गजानन मोरे, सचिन पाटील, हर्षवर्धन साळुंखे, हेमंत भोईटे, गणेश पाटील, मोहन भोळे, संजय पवार, जितेंद्र वानखेडे, पलाश राखुंडे आदी उपस्थित होते