TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सचिन वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला : शिवसेना

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. सचिन वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

अँटीलिया स्फोटक सापडलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन प्रकरणात अटक झालेले सचिन वाझे यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझे यांनी मुंबई हायकोर्टात तसा अर्ज दाखल करून आपल्या अटकेला बेकायदा म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्था NIA ने आपल्याला केवळ संशयाच्या आधारावर अटक केली. हे चुकीचे आहे. हायकोर्टाने त्यांची याचिका सुनावणीसाठी मान्य केली असून लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे. याच दरम्यान, शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेने आपल्या अग्रलेखात लिहिले की, सचिन वाझे यांना अखेर अटक केलीच याचा काही लोक आनंद साजरा करत आहेत. वाझे यांचे काही चुकले असेल किंवा स्फोटकांप्रकरणी त्यांचा काही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिस, दहशतवाद विरोधी पथक सक्षम होते. पण, केंद्रीय पथकाला तसे होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझेंना अटक करून महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला. हे सर्व काही ठरवून करण्यात आले आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. महाराष्ट्राच्या एखाद्या प्रकरणात नाक खुपसण्याची संधी केंद्र सरकार सोडत नाही.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अर्णबच्या अटकेचा बदला घेतला – शिवसेना

शिवसेनेने पुढे लिहिले, की अँटीलिया प्रकरणात सचिन वाझेंना अटक केल्याचा भाजपला जो आनंद होत आहे तो शब्दांत मांडता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी सचिन वाझे यांनीच रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपचा ‘महंत’ असलेल्या अर्णब गोस्वामीला अटक केली होती. अन्वय नाइक प्रकरणात त्याला तुरुंगात डांबले होते. त्यावेळी गोस्वामीचे नाव घेऊन लोक रडगाणे करून वाझे यांना शाप देत होते. थांबा, केंद्रात तर आमचीच सत्ता आहे, आम्ही पाहून घेऊ’ असेही म्हटले होते. तीच संधी आता साधून घेतली आणि एक प्रकारे सूड उगवला असे शिवसेनेने म्हटले आहे.

२५ मार्चपर्यंत NIA च्या हवाली वाझे

सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने १४ मार्च ते २५ मार्च पर्यंत NIA च्या हवाली केले आहे. त्यांना अँटीलिया जवळ स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी शुक्रवारीच वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. पण, प्राथमिक पुरावे त्यांच्या विरोधात असल्याचे सांगताना सत्र न्यायालयाने ती मान्य केली नाही. तसेच यावर पुढील सुनावणी १९ मार्च पर्यंत स्थगित केली.

आणि अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा ‘स्फोट’ झाला!

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, मुंबई पोलीस दलातील एक तपास अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीत जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. त्यामुळे खळबळ माजली. अंबानींचे नाव आल्यामुळे हे सर्व प्रकरण पोलिसांनी फारच मनावर घेतले. हे सर्व का झाले, कसे झाले यावर चर्चा सुरू झाल्या, पण काही दिवसांतच या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्याने अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा ‘स्फोट’ झाला आहे, असं लेखात म्हटलंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

महापालिकेत भाजपचीच सत्ता, फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : २२ ते २८ मे २०२२ जाणून घ्या… तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा?

May 22, 2022

जामनेर : शाळेची बसची झाडावर आदळली ; दोन शिक्षकांसह २५ विद्यार्थी जखमी !

March 31, 2023

रावेर हादरले : तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खून ; आईसह सावत्र पित्याला अटक !

June 1, 2024

भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

November 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group