जळगाव (प्रतिनिधी) पीचडी २०१९च्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कालावधी फी भरल्यापासून गृहीत धरावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष विरेश पाटील यांनी दिला आहे.
विद्यापीठाने पेट परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत २९ एप्रील २०१९ ते २० मे २०१९ अशी जाहीर केली. विद्यापीठाच्या पीएचडी साठीच्या २२ नोव्हेंबरच्या नियमावलीनुसार पेट परीक्षा घेण्याआधी मार्गदर्शकाची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होती. परंतू तो मार्गदर्शकांची यादी विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ असमर्थ ठरले. त्यानंतर १ जून २०१९ हॉल तिकीट मिळणार होते व परीक्षेची तारीख ९ ते १२ जुन २०१९ होती. परंतु, विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी न झाल्याने नेट सेट परीक्षा असल्याच्या नावाखाली परीक्षेचे वेळापत्रक जूनच्या अखेरीस प्रसिद्ध करतील, असे विद्यार्थ्यांना कळविले. जून २०१९ अखेरीस विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या नाही आणि परीक्षा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली.
बरेच निवेदन दिल्यावर विद्यापीठाकडून ८ फेब्रुवारी २०२० प्रोव्हिसनल गाईडलिस्ट जाहीर करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०२० ला फायनल गाईडलिस्ट विद्यापीठाकडून जाहीर झाली. Gulde तसेच विद्यार्थ्यांना willingness लेटर १८ ऑगस्ट २०२० पासून अपलोड करायचे होते.
पीएचडी कोर्से वर्क
१ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यान संशोधक विद्यार्थ्यांनी पूर्ण केला असून पीएचडी कोर्से वर्कच्या परीक्षेतही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांनी रिसर्च आऊटलाईन व पीएचडी पेपर – ३ ची ही प्रक्रिया मार्गदर्शक व रॅकच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. विद्यापीठाने आरआरसी जुलै च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होईल, असे विद्यार्थ्यांना कळविले होते. परंतु, या प्रक्रीयेतही विद्यापीठ स्तरावरून दिरंगाई झाल्याचे दिसून येते. तरी विद्यापीठ स्तरावरून आरआरसीची प्रक्रिया राबवावी व न्याय द्यावा.
विद्यापीठाने पीएचडी २०१९ च्या विद्यार्थ्यांना ९ नोव्हेंबर २०२० रोजी जो टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे. तोच रजिस्ट्रेशन नंबर व ३ नोव्हेंबर २०२० या तारखेपासूनच पीचडीचा कालावधी ग्राह्य धरण्यात यावा, कारण संशोधकांनी या कालावधीपासूनच त्यांचे कार्य सुरू केले आहे व रॅक ची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. तसेच पीचडीसाठी असलेली संपूर्ण फी पण याच कालावधीत भरलेली आहे.
आपण विद्यार्थ्यांना भवितव्याच्या दृष्टीकोनातून या समस्येबाबत तातडीने योग्य तो विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.