नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्ष पूर्ण होत असताना सुरक्षादलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. जम्मू बस स्टँडवरुन सुरक्षादलाने ७ किलो विस्फोटक साहित्य जप्त केले आहेत. सुरक्षादलाने जम्मूच्या संपूर्ण बस स्टँडवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनुसार, दहशतवादी पुलवामाच्या दुसऱ्या वर्षपुर्तीवर मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत होते.
आजचा दिवस म्हणजेच १४ फेब्रुवारी हा प्रत्येक भारतीयसाठी काळा दिवस आहे. २ वर्षापूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले होते. आता पुन्हा दोन वर्षानंतर याच दिवशी मोठ्या हल्ल्याच्या कट उधळून लावण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधून जम्मूच्या बस स्थानकातून ७ किलो विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी हल्ला करण्याची संशय होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती. “गेल्या ३-४ दिवसांपासून आम्ही अलर्ट होतो. दहशतवादी पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते आणि हा हल्ला जम्मू शहरात होणार होता. शनिवारी रात्री पोलिसांनी सोहेल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. तो संशयितरित्या फिरत होता. सोहेल हा अल बदर तनजीम या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडे चौकशी करत असताना साडे सहा किलो IED सापडले”, अशी माहिती जम्मूचे आयजी मुकेश सिंह यांनी दिली.
संशयिताकडे चौकशी केली अशता तो नरसिंह कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं त्यानं सांगितलं. तो चंदीगडमध्ये शिकत होता. त्याला पाकिस्तानमधून एक मेसेज आला होता की, या ठिकाणी IED ठेवायचे आहेत. या मेसेजद्वारे IED ठेवण्यासाठी ३-४ जागा सांगितल्या गेल्या होत्या. त्यात रघुनाथ मंदिर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि लखदाता बाजार या जागांचा समावेश होता. त्यानंतर त्याला श्रीनगरसाठी प्लाईट घ्यायची होती. तिथे अथर शकील नावाच्या व्यक्तीला भेटायचं होतं. या हल्ल्याची माहिती चंदीगडमधील अजून एका मुलाला माहिती होती, त्याचं नाव काझी वसिम आहे. त्यालाही चंदीगडमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यासोबतच हाफिद नवी या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच झाला होता पुलवामा हल्ला
१४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये तहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने CRPF च्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये एक बस बॉम्बने उडवण्यात आली होती. हल्ल्यामध्ये CRPF चे ४० जवान शहीद झाले होते. जैशने पाकिस्तानची गुप्त एजेंसी ISI सोबत मिळून कट रचला होता. NIA ने १९ लोकांना या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोपी बनवले होते, ज्यामध्ये ६ जणांना सैन्याने चकमकीत मारले होते. पुलावामा हल्ल्याच्या १२ दिवसांच्या आतच इंडियन एअरपोर्सने शहीद जवानांचा सूड घेतला होता. एअरफोर्सने बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करुन दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. या कारवाईमध्ये ३०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो.