TheClearNews.Com
Tuesday, June 10, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे…जागेच्या वादातून जळगावात महिलेवर जादूटोण्याचा प्रयत्न ; पाच जणांविरुद्ध गुन्हा !

अमावशा, पौर्णिमेच्या रात्री घरासमोर ठेवायचे सुया टोचलेली काळी बाहुली आणि कणकेचा गोळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वडिलोपार्जीत जागा खाली करावी म्हणून न्यायालयात केलेल्या दाव्याचा निकाल विरोधात गेला म्हणून एका महिलेवर जादूटोणा (Black Magic In Jalgaon) केल्याच्या आरोपातून पाच जणांविरुद्ध अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

या संदर्भात शिवाजी नगर दालफड परिसरातील रहिवासी अंजली केदार भुसारी वय-३९ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराशेजारी राहणारे 1) प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी 2) ललिता प्रकाश व्यास 3) सुशिला गोपाळ पंडित 4) विद्या गोपाळ पुरोहित 5) गौरीलाल रुपचंद पुरोहित हे गेल्या शेजारी ४० ते ४५ वर्षापासून राहतात. सदरची जागा ही अंजली भुसारी यांची वडीलोपार्जीत जागा आहे. त्यांचे आजल सासरे यांनी वरील तिघांना सदरची जागा ही वापरण्यास दिलेली होती. त्यानंतर सन २००७ मध्ये सौ. केदार यांचे सासरे व पती यांनी वरील लोकांना त्यांना दिलेली जागा खाली करण्यास सांगितले. परंतू पाचही जणांनी याबाबत नकार दिला. त्यामुळे सन २००७ मध्ये जागेचा ताबा मिळावा म्हणून किशोर नारायण भुसारी यांनी जळगाव न्यायालयात वरील लोकांविरुध्द दिवाणी स्वरुपाचा खाजगी दावा दाखल केला होता. खटल्याचा निकाल सन २०१७ मध्ये भुसारी यांच्या बाजूने लागला. तेव्हापासून वरील लोक हे भुसारी यांच्या घराच्या दरवाज्याजवळ उडिद, मोहरी तसेच रक्षा असे टाकून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत होते.

दि.३० मे रोजी अमावस्याच्या दिवशी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अंजली भुसारी यांच्या घराच्या गेटवर कोणीतरी मानवी केस व हळद कुंकू टाकलेले दिसले. त्यानंतर रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यानंतर जनरेटर सुरू होण्याच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसम हे आमचे घरावर दगड मारत होते. काही दिवस गेल्यानंतर दि.१४ जून पौर्णीमेच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास सौ. भुसारी या रात्री वाळत घातलेले कपडे काढायला घराच्या समोरील ओपन स्पेसमध्ये गेले तेव्हा वाळत घातलेल्या त्यांच्या गाऊनवर रक्त टाकलेले दिसले. त्यानंतर दि.२८ रोजी दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान लाईट गेलेली होती. एक तासानंतर सौ. भुसारी या बाहेर निघाल्यावर लक्षात आले की, गेटावरुन कणकेचा गोळा त्यावर काळी बाहुली हळद कुंकू वाहिलेली, त्यावर पिवळ्या अक्षरामध्ये अंजली नाव लिहीलेले आहे.

 

एवढेच नव्हे तर,  त्यासोबत काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधलेल्या त्या बाहुलीच्या अंगावर ठिकठिकाणी पिवळ्या रंगानी फुली करून ठिकठिकाणी सुया टोचलेल्या असे समोर पडले.  त्यामुळे अंजली भुसारी यांनी 1) प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी 2) ललिता प्रकाश व्यास 3) सुशिला गोपाळ पंडित 4) विद्या गोपाळ पुरोहित 5) गौरीलाल रुपचंद पुरोहित यांनी संगनमत करुन आमची वडिलोपार्जित जागा त्यांनी खाली करावी म्हणून आम्ही त्यांचेविरुध्द न्यायालयात केलेल्या दाव्याचा निकाल आमच्या बाजूने लागल्याचे कारणावरुन वरील लोकांनी दि.३ फेब्रुवारी २०२२ ते दि.२८ जून २०२२ पावेतो प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घराच्या दाराजवळ मानवी केस व हळद कुंकू टाकलेले, काळी बाहुली हळद कुंकू वाहिलेली त्यावर पिवळ्या अक्षरामध्ये अंजली नाव लिहीलेली व त्यासोबत काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधलेल्या त्या बाहुलीच्या अंगावर ठिकठिकाणी पिवळ्या रंगानी फुली करुन ठिकठिकाणी सुया टोचलेल्या असे टाकुन सौ. भुसारी यांना घाबरवण्याचा अथवा त्यांच्या जिवाचे बरे वाईट होण्याच्या उदेदशाने वरील कृत्य केल्याबाबत तक्रार केली. त्यानुसार संबंधित पाचही जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंध कायदा अधिनीयम 2013 कलम 3(2) सह भादवी कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

June 9, 2025
गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
Next Post

बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांना ५० लाखाची मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

January 17, 2021

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी !

July 31, 2024

भुसावळमधील कुख्यात मोनू कोल्हेविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

March 10, 2023

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

February 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group