औरंगाबाद (वृत्तसंस्था) तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. डॉक्टर महिलेने अभियंता पतीच्या त्रासाला कंटाळुन पाच दिवसांपूर्वी रक्तवाहिनीत इन्सुलीनचे इजेक्शन घेतले होते.
या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर तरुणीच्या पतीसह सासूवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाच पानांची सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. स्वतःच तिने आपल्या हातावर इंजेक्शन घेतलं आणि जीव दिलाय. रक्तवाहिनीत इन्सुलिनचं इजेक्शन घेत डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचं नाव वर्षा असून तिनं लव्ह मॅरेज केलं होतं. तीन महिन्यांआधीच तिचं लग्न झालं होतं. डॉक्टर वर्षा यांचा पती इंजिनिअर होता. तीन वर्षांपासून वर्षा आणि तिच्या पतीचे प्रेमसंबंध होतं. मात्र लग्नाला अवघे काही महिने उलटल्यानंतर डॉक्टर वर्षा यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.
डॉ. वर्षा अंबादास व्यवहारे (२५) आणि अभियंता धनंजय वसंत डोंगरे (रा. सावरगांव पोखरी, ता. गेवराई, जि. बीड, ह.मु.सरोदे कॉलनी, हमालवाडा, रेल्वेस्टेशन) या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी २ मे २०२२ रोजी आळंदी येथील रिध्दी सिद्धी मंगल कार्यालयात मुलाच्या कुटुंबाच्या विरोधामुळे प्रेमविवाह केला. धनंजय हा पैठण येथील फुड कंपनीत तर डॉ. वर्षा या शहरातील खाजगी दवाखान्यात नोकरी करीत होत्या. लग्नानंतर धनंजय यास डॉ. वर्षाच्या कुटुंबियांनी स्विकारले. मात्र डॉ. वर्षा यांना पतीसह सासू सिंधुबाई, सासरा वसंत डोंगरे आणि दीर बप्पा यांनी काही दिवसात त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर ३ ऑगस्टला रात्री पतीसोबत भांडण झाल्यामुळे डॉ. वर्षा यांनी खोलीचा दरवाजा बंद करुन २ हजार मी.मी. एवढे इन्सुलीनचे औषध रक्तवाहिनीमध्ये इजेक्शनने घेतले. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हापासून बेशुद्ध असलेल्या डॉक्टरवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी (दि.९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सासरा पतीसह, सासू-सासरा,दीराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला.
मम्मी-पप्पा प्लीझ माफ करा
”मम्मी पप्पा मला माफ करा. माझ त्याच्यावर प्रेम होत. पण तुमच्यापेक्षा जास्त नव्हत. मी त्याला लग्नाला नाही म्हणत होते पण त्याने मला धमकी देऊन बोलावुन घेतल. तो फसवत गेला आणि मी फसत गेले. आता सुद्धा माझी इच्छा नव्हती मरायची पण मी जे काई केले त्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला आणि आता मला एकटी समाजाला सामोर जायला त्रास होयलाय. तुम्हाला मी इथुन पुढे पण त्रास दिला असता तुमच्यावर माझी जबाबदारी पडली असती. मी मेल्याच्या त्रासातुन तुम्ही बाहेर पडताल पण मी जगले असते तर तुम्हाला जास्त त्रास झाला असता.”
– तुमचीच डॉ. वर्षा.