जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेत झालेल्या अभुतपूर्व बंडानंतर आता आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईसह ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरे “निष्ठा यात्रे” दरम्यान दौरा करत आहेत. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटी, मेळावे ते घेत आहेत. आदित्य ठाकरे हे ९ ऑगस्ट रोजी आता जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते पाचोरा, पारोळा आणि धरणगाव या तीन मतदार संघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
आदित्य ठाकरे हे ९ ऑगस्ट रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. रात्री उशिरा त्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. यानुसार ९ ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे हे सकाळी १०:१५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर पाचोरा येथे ११ : ३०, धरणगावला १:४५ आणि पारोळा दुपारी ३:३० वाजता कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे हे संवाद साधणार आहेत. यानंतर ते धुळेच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा दौरा रात्री प्राप्त झाला आहे. आज जिल्ह्यासह धरणगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आदित्य साहेबांच्या दौऱ्याचे नियोजन करणार असल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसेनेतून बाहेर गेलेल्या आमदारांवर टिकास्त्र सोडत आहेत. त्यातल्या त्यात मूळ शिवसैनिकांना ठाकरे गटात टिकून राहण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यातून काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल होत आहे. शिवसैनिकांना पुन्हा उभारी मिळत आहे. त्यांना आता जळगाव जिल्ह्यातील तुटलेली शिवसेना जोडण्यात किती यश येते?, हे या दौऱ्यानंतर समजणार आहे.