नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याची घोषणा करून देवेंद्र फडणवीसांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अगदी त्यांनी मी स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असंही स्पष्ट केलं. परंतु आता भाजपच्या केंद्रीय टीमने हे ठरवले की, देवेंद्रजींनी पदभार स्वीकारावा आणि राज्यातील सरकारमध्ये असावं. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, अशी माहिती खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा माध्यमांना म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय टीमने हे ठरवले की, देवेंद्रजींनी पदभार स्वीकारावा आणि राज्यातील सरकारमध्ये असावं. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा भाग व्हावे, असे म्हटले आहे. अशाप्रकारचा निर्णय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे, याची माहिती त्यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती की, ते सरकारच्या बाहेर राहून पाठिंबा देतील. तसेच भाजपचं एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे पाठिंबा राहील. त्यांची ही भूमिका आमच्या पक्षाच्या कार्यकर्ता आणि नेत्याचं चरित्र दर्शवतं. आम्हाला कोणत्याही पक्षाचं स्वार्थ नाही, हे दाखवून देत आहे. आम्ही पदाच्या लालसेसाठी नाही आहोत, आम्ही विचारासाठी आहोत. विचारासोबतच महाराष्ट्राच्या जनतेचा विकास होवो, जनतेची आकांक्षा पूर्ण व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपासून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. पण भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र यांना सरकारमध्ये आलं पाहिजे, अशा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीमने देवेंद्र यांनादेखील आग्रह केला आहे. केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा, असा आदेश दिला आहे”, अशी माहिती जे पी नड्डा यांनी दिली.