जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक अपात्र करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा न्यायालयाने दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, राज्यभर गाजलेल्या जळगाव महापालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना शिक्षा झाली होती. यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव जिल्ह्या न्यायालयात घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी याबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल होती. याप्रकरणी जिल्ह्या न्यालयाचाने आज १३ एप्रिल रोजी निकाल देत पाच पैकी चार नगरसवेकांना अपात्र ठरवले आहे. पाच नगरसेवकांपैकी दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती असल्यामुळे इतर चार नगरसेवक लता भोईटे, भगतभाई बालानी, कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे. याचिकाकर्तेकडून ऍड. सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले.
न्या. एस.पी.सैय्यद यांनी निकाल देताना या चौघांना शिक्षेचा निकाल लागल्यापासून पुढील सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढता येणार नसल्याचे नमूद केले आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी हा निकाल लागला होता. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्यांना उभे राहता येणार नाही. दरम्यान, घरकुल घोटाळ्यात झालेल्या शिक्षेमुळे नगरसेवक पद जाण्याची शक्यता पाहता चौघांनी शिक्षेच्या निकालाला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात केला होता. या न्यायालयाने चारही जणांचा अर्ज फेटाळून लावला होता.