मुंबई(वृत्तसंस्था) भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिकलेल्या 23 जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिंकलेल्या 23 जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे जळगाव, रावेरसह २३ मतदार संघात निरीक्षकांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?
भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईक
धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे
नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके
जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेर
रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे
अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे
जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह
नांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुख
बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक
लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ
माढा- भागवत कराड, प्रसाद लाड
सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील
नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे
भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ
गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील
वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील
अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी
दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर
उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर
उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे
उत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे
भाजपने नेमलेले हे निरीक्षक नेमकं काय भूमिका बजावणार?
नेमलेले निरीक्षक स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून लोकसभा मतदारसंघात खासदाराबाबत लोकांचे मत काय आहे?, 2019 साली निवडणूक आलेला खासदार पुन्हा निवडुन येऊ शकतो का? आणि जर नसेल तर दुसरा कोण उमेदवार देता येईल का? याबाबत निरीक्षक त्या-त्या लोकसभा मतदारसंघाची सर्व माहिती घेऊन एक रिपोर्ट तयार करून रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करतील. या रिपोर्टच्या आधारेच विद्यमान खासदाराला संधी द्यायची की उमेदवार बदलायचा याचा निर्णय वरिष्ठ घेतील.