TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून ८४ कोटींच्या मदतीचा बुस्टर डोस…

प्रति हेक्टर १० हजार रुपये ३ हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत व वाढीव अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2025
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भाजपा – महायुती सरकारने पुन्हा एकदा संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. अतिवृष्टीग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विशेष अतिवृष्टी पॅकेजची घोषणा केली होती त्यात चाळीसगाव तालुक्याचा व जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा समावेश नसल्याचा अपप्रचार काही लोकांनी सुरु केला होता. मात्र चाळीसगाव मतदारसंघाचे शेतकरीपुत्र आमदार मंगेश चव्हाण यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शासनाच्या सर्व सवलती चाळीसगावसह जळगाव जिल्ह्याला लागू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी ₹१०,००० रुपये (३ हेक्टरच्या मर्यादेत) या दराने ७६.२५ कोटी इतके आर्थिक सहाय्य चाळीसगाव तालुक्यातील ८१ हजार शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यापूर्वीच २ हेक्टरच्या मर्यादेत १०१ कोटी इतके अनुदान वितरण सुरु झाले असून ३ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या ३९१३ शेतकऱ्यांना ८ कोटी ४० लाख इतका निधी प्राप्त झाला आहे. यामुळे शासन निर्णयावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या बोलबच्चन फेक शेतकरी पुत्रांची मात्र बोलती बंद झाली असून खोट बोलून राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्यांचा चेहरा उघडा पडला आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे, भाजपा महायुती सरकार…

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

चाळीसगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी पॅकेजच्या मार्फत मंजूर एकूण अनुदान :

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दराप्रमाणे (२ हेक्टर पर्यंत) : ₹१०१ कोटी
अतिवृष्टी पॅकेज अंतर्गत रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी ₹१०,००० रुपये (३ हेक्टरच्या मर्यादेत) : ₹७६.२५ कोटी
अतिवृष्टी पॅकेज अंतर्गत वाढीव १ हेक्टर पर्यंत अनुदान – ₹८.४० कोटी

अशाप्रकारे यापूर्वीच मंजूर झालेल्या यापूर्ती मदतीसह, चाळीसगाव मतदारसंघासाठी मिळालेलं एकूण सहाय्य आता तब्बल ₹१८५.६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

जिल्ह्याला मिळालेल्या ५६२ कोटींपैकी १८५ कोटी निधी म्हणजे ३३ टक्के निधी हा एकट्या चाळीसगाव तालुक्याला – आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने जे दि.९ व १० ऑक्टोबर अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांचे दोन शासन घेतले होते त्याचा संदर्भ घेऊन काही मंडळींनी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मी तेव्हा शब्द दिला होता की शासनाच्या सर्व सवलती व निधी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल. आणि जिल्ह्याला मिळालेल्या ५६२ कोटींपैकी १८५ कोटी निधी म्हणजे ३३ टक्के निधी हा एकट्या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. काही बँक ह्या शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम कर्जखात्यात जमा करत असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या होत्या. मी तात्काळ तालुक्याचे तहसीलदार व जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक यांना लेखी सूचना देऊन शेतकऱ्यांचे अनुदानाचा १ रुपया देखील कर्जखात्यात जमा न करण्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मिळालेली ही मदत केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, ती माझी व सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी, संवेदनशीलता आणि बांधिलकी आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचा सन्मान आणि स्थैर्य हीच खरी विकासाची पायाभरणी आहे. या संवेदनशील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संपूर्ण महायुती सरकारचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
जळगाव

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘कृषी माऊली सोहळा’ उत्साहात

July 26, 2026
Next Post

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातून दोघे हद्दपार ; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश !

January 29, 2024

उद्धव ठाकरेंनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट !

August 9, 2024

कलाविश्वाला आणखी एक धक्का दिग्दर्शक ‘विजय रेड्डी’ यांचे निधन

October 10, 2020

जलजीवन मिशन अभियान यशस्वी होण्यासाठी यंत्रणांनी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

January 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group