धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कोट बाजार स्थित शास्त्री चौकात आज देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम, धरणगांव नगर प्रशासनतर्फे संजय मिसर आणि पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद नंतर धरणगाव शहर ब्राह्मण समाज अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.किशोर भावे, कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विजयकुमार शुक्ला, आनंद बाचपाई यांनी शास्त्रीजी व महात्मा गांधीजींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर सर्व समाज बांधवांनी पुष्प अर्पण करून नतमस्तक होऊन त्या थोर नेत्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
या जयंती सोहळ्यात किरण अग्निहोत्री, ललित उपासनी, श्रीकांत भावे, विनय भावे, पापरीकर, महेश भावे, संजय जोशी, अनिल वैद्य, सागर.भावे, कृष्णा शुक्ला, रोशन पांडे, विनोद शुक्ला, प्रणव बाचपाई, हेमांगी अग्निहोत्री, पूर्वा कुलकर्णी, दीपाली भावे, आरती भावे, वैशाली जोशी, दीपा जोशी यांच्यासह शहरातील यजुर्वेदीय ब्राह्मण समाज व कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे शेकडो बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.