TheClearNews.Com
Wednesday, June 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी भाजपचा जनआक्रोश ; ठाकरे सरकार नालायक असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. हा प्रश्‍न घेवून भाजपने राज्य शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे ठाकरे सरकार नालायक सरकार आहे. असे नालायक सरकार असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची घणाघाती टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ठाकरे सरकारच्या विरोधात आज दुपारी जळगावात भाजपच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजप नेते गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्त्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तेथे जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे सरकारला लक्ष्य करताना गिरीश महाजन बोलत होते. शेतकऱ्यांचे कापण्यात आलेले वीज कनेक्शन तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

READ ALSO

पोलीस दलातील 19 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

भाजप नेते गिरीश महाजन पुढे म्हणाले की, यावर्षी शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले म्हणजे नुसते कागद काळे झाले. मंत्री आले, शेतीतील नुकसान पाहून गेले. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासने मिळाली. पण एक दमडीचीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. हे सरकार नुसती आपली पाठ थोपटून घेत आहे. आमचे सरकार एक नंबर, आमचे मुख्यमंत्री एक नंबर म्हणवून घेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आज शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच व्यापारी असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. हे सरकार लायक नाही तर नालायक सरकार आहे, अशी टीका करत गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. आठवडाभरात शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही बैलगाडी, ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी सांगितले.

मोर्चात भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंदू पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आदींसह जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पोलीस दलातील 19 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या

June 25, 2025
जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
Next Post

25 Euro Rabatt Ohne Einzahlung

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य २२ जुलै २०२३ !

July 22, 2023

धक्कादायक : शेतात खत टाकताना शेतकऱ्याचा अचानक मृत्यू !

August 23, 2023

पाणीपुरवठा योजनांचा धडाका : जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांसाठी तब्बल ९६ कोटी निधींची तरतूद !

January 19, 2022

रस्त्यावर १० रुपयांच्या नोटा टाकून लांबवले १ लाख ३५ हजार ; वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

July 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group